मान्सूनचा फटका पाच दिवसांत १६ जणांनी गमावले प्राण   

मुंबई : वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने पाच दिवसांत विविध घटनांमध्ये १६ जणांचे प्राण घेतले आहेत. पावसामुळे जमीन खचणे, वीज कोसळणे, झाड किंवा इमारत कोसळणे आदी घटनांचा यामध्ये समावेश असल्याचे राज्य सरकारच्या अहवालात म्हटलेे आहे.
 
यावर्षी, महाराष्ट्रात मान्सून वेळेआधीच म्हणजे २४ मे रोजी दाखल झाला. केरळमध्ये १६ वर्षांनंतर प्रथमच लवकर दाखल झालेल्या मान्सूनने अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात प्रवेश केेला. मुसळधार पावसाने राज्यातील बहुतांश भागाला झोडपून काढले. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये पुणे जिल्ह्यात तीन, ठाणे, लातूर आणि भंडारामध्ये प्रत्येकी दोन, रायगड, अहिल्यानगर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, मुंबई उपनगर आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. याशिवाय, २४ मे पासून पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १८ जण जखमी झाले आहेत. यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे ४१ पशूधन गमवावे लागले, असेही अहवालात म्हटले आहे.

Related Articles